तर २३ तारखेला हरेंद्र कांबळे यांचा फोन आला की; उद्या कुठे आहे म्हणून...? मी देखील उत्तरलो, काही ठरलं नाही आहे. तर ते मला म्हणाले जाऊया का उद्या बदलापूर ला एके ठिकाणी आणि मी लागलीच होकार दिला. तर ते ठिकाण होते, बदलापूर येथील देवलोळी गावात असलेली चावीच्या आकाराची विहीर अथवा बारव चे... दिनांक २४ जून ला ठरल्याप्रमाणे सकाळी ८ वाजता आम्ही दोघे बदलापूर कडे निघालो. घरून निघतो न निघतोच जोराचा पाऊस सुरू झाला. पावसाचा आनंद घेत आमचा प्रवास दुचाकीवरून बदलापूर कडे सुरू होता. तासाभरात आम्ही बदलापूर पश्चिमेला बदलापूर गावाच्या पुढे अंदाजे ४.५ किमी अंतरावर असलेल्या देवलोळी गावात येऊन पोहोचलो होतो. याच गावात आहे ही मध्युगीन काळातील ऐतिहासिक बारव. आम्ही जेव्हा गावात पोहोचलो तेव्हा पाऊस हलकासा रिमझिम बरसत होता. आता आम्ही विहिरीकडे येऊन उभे ठाकलो होतो. मध्ययुगीन कालखंडातील अंदाजे १७ व्या शतकातील ही विहीर बदलापूर चे ऐतिहासिकृष्ट्या महत्व अधोरेखित करत येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटक अथवा इतिहास प्रेमींना दर्शन देत आजही तितक्याच दिमाखात उभी आहे. या विहिरीच्या बांधणीचा कालखंड आणि त्यासंबंधीचा इतिहास समजण्य...
नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीत भटकंती करताना त्यातील गडकिल्ले, लेण्या यांचा माहितीपर प्रवासवर्णन तसेच मी भेटी दिलेल्या काही प्रसिद्ध ठिकाणे, पर्यटन स्थळांची माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहे.