मुख्य सामग्रीवर वगळा

इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा


नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे.

प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधारणत: २५०० वर्षापूर्वी या भूमीत वर्ण, जात व्यवस्थेची बीजे रोवली आहेत. 

( काहींसाठी :- होय २५०० वर्षापूर्वी... आणि तुम्ही जे शोधताय ते ५००० वर्षापूर्वी आहे.) 

वर उल्लेखीत या किडीने या मंगल भूमीस पोखरुन ठेवलेले आहे. कधी नव्हे ते याचा भडका उडून देशाचे काही बरे वाईट तर नाही होणार ना...याची भीती वाटते. यामुळे; देश कधी नव्हे इतका मागे गेला आहे, जातो आहे. माणूस च माणसाचा वैरी झाला आहे ते केवळ आणि केवळ जेत्यांचा आजपर्यंत लिहिलेल्या इतिहासावर विश्वास ठेवल्याने... या इतिहासावर आपण आतापर्यंत विश्वास ठेवला परंतु; याहीपुढे याच इतिहासावर विश्वास ठेऊ इच्छित असाल तर मात्र जेत्यांच्या लिहिलेल्या इतिहासावर टीका करण्याचा काही एक अधिकार तुम्हाला नाही, हे ही यावेळी नमूद करावे वाटते.

तर आता येऊ मूळ मुद्द्यावर...

भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेली सर्व महापुरुष जी कोणत्याही जात, वर्ण विरहित लढलीत. तेव्हा कुठे इतक्या वर्षाची गुलामगिरी जाऊन देश स्वातंत्र्य झाला. पण हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी व ती वेळ कधी नव्हे ती आता समस्त भारतीयांवर येऊन ठेपलेली आहे. आधुनिक भारतीय समाजाची वाटचाल जर जात, वर्ण भेदाभेद मुक्त या दिशेने व्हावी; असे जर वाटत असेल, तर हे स्वप्न साकार करण्याची उत्तरे आजपासून ५००० वर्षापूर्वीच्या इतिहासात लपलेली आहे. तो इतिहास समजून घेतला पाहिजे. समाजातील दानशूर लोकांनी ही उत्तरे ज्यांच्याजवळ आहे; त्यांना संशोधनासाठी सहकार्य केले पाहिजे, हेही यानिमित्ताने इथे प्रकर्षाने इथे नमूद करावेसे वाटते.

✍️ रोहित रा. भोसले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

मैत्री - प्रथम व अंतिम मानव धर्म

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा...