मुख्य सामग्रीवर वगळा

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...?

हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की, कॅमेरा किंवा कॅमेराचा मोबाईल या सारख्या उपकरणाचा शोध ध्यानीमनी सुद्धा नव्हता. मग हे कसे शक्य आहे... ?? सांगतो...सांगतो... तेव्हाच्या कलाकारांनी ही आठवण दगडावर शिल्पाच्या स्वरूपात चित्रित अर्थात शिल्पीत करून ठेवली. हे म्हटल्यावरही तुम्हाला अजूनही माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल. तर तुमच्या भेटीला वर जोडलेले छायाचित्र तुमचा विश्वास बसावा यासाठी आणले आहे. 

वरील चित्रात दिसत असलेल्या शिल्पपटात मध्यभागी बुध्द प्रलंबपाद अवस्थेत धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत कमळपुष्प आसनाधिष्टित मंचकावर विराजमान असून कमळ पुष्पाच्या देठाला नागराजे आधार देताना दिसत आहे. या महत्वाचा शिल्पावर माझ्यापेक्षा ज्येष्ठ महानुभावांनी वेळोवेळी लिहिले आहेच. तर या शिल्पाच्या दोन्ही बाजूला असलेल्या युगुलाकडे मला तुमचे लक्ष वेधायचे आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक फोटो समोरून सरळ काढ त्याप्रमाणे चित्रातील डाव्या बाजूचे युगुलशिल्प हे शिल्पबद्ध झाले असून यामध्ये युगुल समोर बघत असून दोघांपैकी स्त्रीने आपला डावा पाय थोडे मागच्या बाजूला नेत आपल्या पुरुष जोडीदाराच्या कमरेला आपला डावा हात घातलेला दिसतो. तर उजवा हात मात्र तिच्या कमरेवर असावा. शिल्प भग्न झाले असल्याने ते आता दिसून येत नाही. तसेच; Candid Photography करताना हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच कटाक्ष टाकताना किंवा तसे नाटक करून फोटो क्लिक करायला तुम्ही जसे सांगता ते करताना मात्र तुम्ही तुमच्या उभी राहण्याची लकब, ढब यात बदल करता अगदी त्याप्रमाणेच उजव्या बाजूच्या शिल्पातील मूळ युगुलाने ही कृती तंतोतंत पार पाडत candid photography ची ही मागणी शिल्पकाराकडे (तत्कालीन छायाचित्रकार) केली असावी व यातूनच या उजव्या बाजूच्या युगुलाच्या शिल्पाची निर्मिती झाली असावी. बुद्ध शिल्पाच्या दोन्ही बाजूला उभे युगुलशिल्प हे मूळच्या एकाच अनामिक दानतात्यांचे दोन वेगवेगळ्या pose मध्ये असलेले शिल्प आहे, असे माझे ठाम मत आहे. खोटे वाटतं असेल तर तुम्ही त्या युगुलाचे चेहरे, फेटे, अधोवस्त्र, स्त्रीने धारण केलेला कमरपट्टा, डोक्यावरील बिंदी, तिची केशरचना हे सर्व सर्व पाहू शकता. 

काय आता तरी बसला विश्वास...?? मला काय ते सांगा आणि हे शिल्प कोणत्या लेणीत आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. 

#चला_समजून_घेऊ_शिल्पांची_भाषा

✍️ Rohit R. Bhosale

टिप्पण्या

  1. the depth of research & observation in your historical analysis is truly impressive...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा

नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधार...

मैत्री - प्रथम व अंतिम मानव धर्म

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा...