मुख्य सामग्रीवर वगळा

यज्ञाच्या अनुषंगाने केलेली मांडणी व पुरातत्वशास्त्राचे जाणकार अभ्यासक बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित इतिहास संशोधनावर आधारित प्रसिद्ध ग्रंथ क्रांती आणि प्रतिक्रांती आपणापैकी बहुत जणांनी वाचला असेल, त्याचे अध्ययन केले असेल. त्यांच्या याच प्रसिद्ध ग्रंथातील एक परिच्छेद पुढीलप्रमाणे असून मी तो, महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड ३, पृ. क्रं. १७४ (इंग्रजी आवृत्ती) मधून घेतला आहे. तो परिच्छेद पुढीलप्रमाणे...

Every sacrifice meant fee to the priest. As to fee, the rules were precise and their propounders were unblushing. The priest performed the sacrifice for the fee alone, and it must consist of valuable garments, kine, horses or gold when each was to be given was carefully stated. The priests had built up a great complex of forms where at every turn fees were demanded. The whole expense, falling on one individual for whose benefit the sacrifice was performed, must have been enormous. How costly the whole thing became can be seen from the fact that in one place the fee for the sacrifice is mentioned as one thousand cows. For this greed, which went so far that he proclaimed that he who gives a thousand cows obtains all things of heaven. The priest had a good precedent to cite, for, the gods of heaven, in all tales told of them, ever demand a reward from each other when they help their neighbour gods. If the Gods seek rewards, the priest has a right to do the same.

त्याचे मराठीत भाषांतर काहीसे असे आहे... " प्रत्येक यज्ञाचा अर्थ पुरोहितासाठी दक्षिणा असा होता. शुल्काच्या बाबतीत, नियम अचूक होते आणि त्यांचे प्रवर्तक निर्लज्ज होते. पुरोहित केवळ दक्षिणासाठी यज्ञ करीत असे आणि त्यात मौल्यवान वस्त्रे, गायी, घोडे किंवा सोन्याचा समावेश असणे आवश्यक आहे. जेव्हा प्रत्येक दक्षिणा काळजीपूर्वक नमूद केले गेले होते. पुरोहितांनी यज्ञाचे एक मोठे जाळे तयार केले होते, जिथे प्रत्येक वळणावर दक्षिणा आकारली जात असे. ज्याच्या फायद्यासाठी बलिदान दिले गेले त्या एका व्यक्तीवर पडणारा संपूर्ण खर्च प्रचंड असावा. संपूर्ण गोष्ट किती महाग झाली हे यावरून दिसून येते की; एका ठिकाणी बलिदानाची दक्षिणा एक हजार गायी म्हणून नमूद केली आहे. या लोभासाठी, जो इतका पुढे गेला की त्याने घोषणा केली की जो एक हजार गायी देतो त्याला स्वर्गातील सर्व गोष्टी मिळतात. पुरोहिताकडे कडे स्वर्गातील देवांचा उल्लेख करण्यासाठी एक चांगला दाखला होता, कारण त्यांच्याबद्दल सांगितलेल्या सर्व कथांमध्ये, ते त्यांच्या शेजारील देवांना मदत करतात तेव्हा नेहमी एकमेकांकडून बक्षिसाची मागणी करतात. जर देव बक्षिसे मागत असतील, तर पुरोहितालाही तसे करण्याचा अधिकार आहे. 

तर मला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रसिद्ध ग्रंथातील या परिच्छेदातील काही ओळीच्या अनुषंगाने काही प्रश्नाची उत्तरे पाहिजे आहे.

1) "पुरोहित केवळ दक्षिणासाठी यज्ञ करीत असे आणि त्यात मौल्यवान वस्त्रे, गायी, घोडे किंवा सोन्याचा समावेश असणे आवश्यक आहे."

2) "... एका ठिकाणी बलिदानाची दक्षिणा एक हजार गायी म्हणून नमूद केली आहे." 

3) "...पुरोहिताकडे कडे स्वर्गातील देवांचा उल्लेख करण्यासाठी एक चांगला दाखला होता."

या वरील ओळींच्या संदर्भाने विचारायचे आहे की; हा संदर्भ कुठे नमूद आहे, हे मला कोणी सांगेल का? मला वाटतं लेण्यातील शिलालेख वाचणारे हे सांगू शकतात. मला ते माहित आहे.  ...आणि होय, हे सर्व पुरावे एकाच ठिकाणी नमूद आहेत. त्याचे उत्तर नाणेघाट येथील ऐहिक लेणे असे आहे.

रोहित राजेंद्र भोसले.
दिनांक :- ०७ ऑक्टोबर २०२५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा

नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधार...

मैत्री - प्रथम व अंतिम मानव धर्म

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा...