मुख्य सामग्रीवर वगळा

'पंचलिंगा'च्या सान्निध्यात चिरविश्रांती घेत असलेल्या बसवय्या-नायक यांच्या स्मरणार्थ वीरगळ

'वीरगळ' म्हणजे युद्धात किंवा कोणत्याही संग्रामात वीरगती प्राप्त झालेल्या शूर योद्धेय सैनिकाच्या स्मरणार्थ उभारलेला कोरीव दगडी पाषाणस्तंभ होय. यावर, सहसा वीर पुरुषाची आकृती, त्यांची शस्त्रे, आणि कधीकधी त्यांना स्वर्गात नेणारे अप्सरा किंवा देवदूत यांचे शिल्पांकन असते. कानडी भाषेत ' कल्लू ' म्हणजे दगड ' वीरकल्लू ' म्हणजे वीराचा दगड यावरून महाराष्ट्रात वीरगळ असा शब्द या वीर योद्ध्यांच्या स्मरणार्थ शिळेला प्रचलित झाला असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. थोडक्यात वीरगळमध्ये युद्धात धारातीर्थी पडलेल्या पुरुषाचे स्मरण असते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सहसा देवळांजवळ किंवा शेतात आढळणारे हे या स्मारकशिळा इतिहासाच्या मूक साक्षीदार आहेत, विरगळाच्या निर्मितीकाळाचा उगम साधारणपणे शिलाहार काळापर्यंत मागे जातो. महाराष्ट्रातही शिवकाळापूर्वी आणि काळातील अनेक गावांत हे वीरगळ गावाचे रक्षण करताना प्राण अर्पण केलेल्या योद्ध्यांची आठवण म्हणून उभे आहेत. हे केवळ मूक दगड नसून ते तत्कालीन युद्धकला, शस्त्रे, पोषाख आणि तत्कालीन सामाजिक जीवनाची माहिती देतात. गावागावांत शेंदूर फासून पूजले जाणारे हे वीरगळ पाषाण महाराष्ट्राच्या पराक्रमी परंपरेचे प्रतीक आहेत. तर कर्नाटकातील अशीच एक सुंदर 'वीरगळ' (वीरस्मारक शिळा) आपल्या भेटीला आणली आहे. ज्यात एका योद्ध्याच्या शौर्यपूर्ण मृत्यूचे स्मरण करून दिले आहे, ज्याने स्वतःला वीरगती प्राप्त होण्यापूर्वी अनेक शत्रूंना कंठस्नान घातले होते.
सदर वीरगळ ही सद्यस्थितीत मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय येथे प्रदर्शनार्थ ठेवली आहे. या वीरगळीचा कालखंड हा शक १२०४ अर्थात ई.स. १२८२ असा असून, यावर कन्नड भाषा व लिपीमध्ये शिलालेख नमूद आहे. उपरोक्त शिलालेखात असे नमूद केले आहे की, "सोगलाकडे जाणाऱ्या मार्गावर तीस व्यक्तींविरुद्ध लढलेल्या एका युद्धात तीन जणांना ठार केल्यानंतर, बसवय्या-नायक हे 'पंचलिंगा'च्या सान्निध्यात चिरविश्रांती घेत आहेत. या शिलालेखातील दिवंगत वीर असलेले बसवय्या-नायक यांचा उल्लेख 'रायराजगुरू मंडलाचार्य समयचक्रवर्ती ईशान्यादावरू' यांच्या घराण्यातील सदस्य म्हणून करण्यात आला आहे."
✍️ रोहित राजेंद्र भोसले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा

नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधार...

मैत्री - प्रथम व अंतिम मानव धर्म

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा...