मुख्य सामग्रीवर वगळा

भिवगड – नव्याने परिचित होणारा एक अपरिचित किल्ला

भिवगड – नव्याने परिचित होणारा एक अपरिचित किल्ला

मित्रांनो, तुम्ही बरोबर वाचलंय कारण ; भिवगड हा काही वर्षापूर्वी ट्रेकर्स व डोंगर भटक्यांच्या नजरेपासून अलिप्त राहिला होता. मुंबई पासून जवळ च असलेल्या या गडावर मात्र आता डोंगर भटके तसेच सह्यप्रेमींची पावले आता वळायला लागली आहे.


भिवगड हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वदप व गौरकामत या गावाच्यामध्ये एक टेकडीवजा किल्ला आहे. इथे येण्यासाठी तुम्ही मध्यरेल्वेच्या कर्जत या स्थानकावर उतरून तिथुन शेयरिंग ऑटो पकडून वदप या गावी उतरावे लागते. वदप व गौरकामत गावाच्या मागेच असलेल्या एक टेकडीवजा डोंगरावर हा किल्ला वसलेला असून दोन्ही गावातून किल्ल्यावर चढाई सुरू करू शकता.


गडाचा घेरा मोठा नसला तरी गडावर १० – १२ पाण्याची टाके दिसून येतात. बालेकिल्ल्याच्या जागी काही बांधकामाचे अवशेष दिसून येतात. तसेच काही वास्तूंच्या जोत्याचे अवशेष सुद्धा दिसून येतात. गौरकामत या गावाच्या इथून गडावर चढाई करत असताना आपल्याना कातळकोरीव पायऱ्यांचा टप्पा लागतो. ह्या पायऱ्या अगदी लहान व काही ठिकाणी भग्न झाल्या आहेत. पावसाळ्यात दगडी पायऱ्यांवर शेवाळ येत असल्याने या दिवसात थोडी काळजी घेऊनच हा कातळकोरीव पायऱ्यांचा टप्पा पार करावा.


मी, ऋत्विक, मंदार, वैभव व कर्तव्य असे पाच जण मिळून आम्ही भिवगड ला गौरकामत या गावातून किल्ल्यासाठी चढाई सुरू केली. माथ्यावर आल्यावर आम्हाला मागे भलामोठा ढाकचा किल्ला दृष्टीस पडला तसेच एका दिशेला संपूर्ण कर्जत चा परिसर व आजूबाजूची गावे दिसून येत होती. ऊन, वारा, पाऊस यांचा सुंदर खेळ अनुभवत आम्ही सुंदर आठवणी मनात साठवून गड उतरायला सुरुवात केली.

मुंबई-पुणे पासून जवळच असलेल्या कर्जत जवळील भिवगड या किल्ल्याला आपण एका दिवसात भेट देऊ शकता.ट्रेकर्समंडळी भिवगड (भीमगड) ते ढाक बहिरी असा रेंज ट्रेक देखील करतात. तर मित्रांनो भिवंगडासंबंधी माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला तुमच्या प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा.

अतिमहत्वाचे :- डोंगर दऱ्यांतून… रानवाटांमधून पावलांच्या ठश्यांशिवाय काहीही ठेऊ नका. साहसी सुखद आठवणींशिवाय काहीही सोबत नेऊ नका.

🙏🙏 धन्यवाद 🙏🙏

अधिक माहितीसाठी किल्ले भिवगड Vlog नक्की पहा



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा

नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधार...

मैत्री - प्रथम व अंतिम मानव धर्म

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा...