मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मुंबईतील वसाहतकालीन भूतकाळाचे अवशेष...

मुंबईतील वसाहतकालीन भूतकाळाचे अवशेष... सदर चित्रात दिसणारा विशिष्ट मैलाचा दगड असून तो मुंबईतील दादर पूर्व येथे दादासाहेब फाळके रोडवर उभा आहे. या दगडावर इंग्रजी लॅटिन अक्षरे तसेच रोमन अंकात VI Miles from St. Thomass Church असे लिहिलेले आहे. हे दगड मूळतः फोर्ट परिसरातील ३०० वर्षे जुन्या सेंट थॉमस चर्चपासूनचे अंतर दर्शवण्यासाठी वापरले जात होते. हे चर्च १८ व्या शतकात मुंबई शहराचे भौगोलिक केंद्र मानले जात होते. त्यांपैकी; उपरोक्त चर्चपासून ते सध्या जिथे उभा आहे अशा दादर पूर्व दादासाहेब फाळके मार्गावरील साधना हॉटेल येथील चौकपर्यंतचे सहा मैलाचे अंतर दर्शवणारा हा दगड मुंबईच्या श्रेणी १ वारसा वास्तू म्हणून नोंद आहे. Remnants of Mumbai's colonial past...  The specific milestone seen in this image stands on Dadasaheb Phalke Road in Dadar East, Mumbai. Inscribed on the stone in English (Latin script) and Roman numerals is the text: "VI Miles from St. Thomas's Church." These stones were originally used to indicate the distance from the 300-year-old St. Thomas's Chu...

तथागत गौतम बुद्धांचे भिक्षापात्र...

तथागत गौतम बुद्धांचे भिक्षापात्र... थेरवाद परंपरेत बुद्धांना धम्मकाया (प्रतिकांच्या) स्वरूपात पुजले जात होते. बुद्धांचा सिंहनाद (धम्मचक्र प्रवर्तन ) निनादल्यापासून बुद्धांची मूर्ती मानवीय स्वरूपात प्रत्यक्षात येईपर्यंत सुमारे ५०० ते ५५० वर्षांचा काळ लोटला. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रत्यक्ष प्रतिमेच्या स्वरूपापेक्षा बुद्धांचे प्रतिनिधीत्व दर्शविण्यासाठी प्रतीकांचा शोध सुरू झाला.साहजिकच बुद्धांच्या जीवनाशी संबंधित वस्तू अथवा घटनांचे स्मरण देणाऱ्या वस्तू प्रतीके म्हणून स्वीकारली गेली. यांमध्ये स्तूप, पांढरा हत्ती, कमळ, घोडा, बोधिवृक्ष, गंधकुटी, वज्रासन, धम्मचक्र, बुद्धपाद (पदचिन्ह) व त्रिरत्न ई. होय. तर वरील सर्व धम्मकाया प्रतीकांपैकी तथागथांचे भिक्षापात्र याविषयी माहिती जाणून घेऊया. आजच्या बिहार राज्यातील गंगा नदीच्या उत्तरेस वसाढ नावाचे खेडे म्हणजेच प्राचीन काळाची राजनगरी वैशाली होय.सध्याचे बिहारमधील वसाढ हेच प्राचीन काळातील वैशाली हे भारतीय पुरातत्व शास्त्राचे जनक अलेक्झांडर कनिंगहम यांनी प्रथमतः सर्वांसमक्ष आणले. तथागतांच्या हयातीत वैशालीस लिच्छवी राजघराणे राज्य कर...

कोंढाणे लेणीच्या विष्णुशास्त्री यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पहिल्या नोंदीचा मजकूर...

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्राचीनकाळाशी नाळ जोडलेली वास्तू म्हणजे किल्ले राजमाचीच्या पायथ्याशी असलेली अंदाजे इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील कोंढाणे लेणी होय. या लेणीसंबंधीत विविध अंगाने, पोस्ट - लेख तसेच अभ्यास दौऱ्यांच्या सहाय्याने मी आपणास यापूर्वी माहिती देत आलेलो आहेच. त्याचप्रमाणे आजदेखील कोंढाणे लेणीसंबंधीची एक जुनी नोंद आपल्यासाठी या पोस्टच्या माध्यमातून घेऊन आलो आहे. आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोतच की; ज्ञात जगताला कोंढाणे लेणीची प्रथम ओळख ही विष्णुशास्त्री यांनी करून दिली. तर त्या घटनेची नेमकी जुनी नोंद खालीलप्रमाणे: मे १८४९ मध्ये पुण्याच्या प्रवासावर असताना, डॉ. विल्सन यांची 'खालापूर' येथे विष्णूशास्त्री यांच्याशी भेट झाली; त्यावेळी विष्णूशास्त्री हे त्या जिल्ह्याचा कारभार पाहत होते. डॉ. विल्सन यांनी विष्णूशास्त्री यांना विनंती केली की, जांब्रुग येथील गुंफांच्या (कोरीव कामांच्या) तपासणीसाठी त्यांनी एखाद्या विश्वासू व्यक्तीला तिथे पाठवावे. यादरम्यान राजमाची टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या या कोंढाणे लेणीचा शोध, वर नमूद केलेल्या परिस्थितीमध्ये जांब्रुग येथे...

'पंचलिंगा'च्या सान्निध्यात चिरविश्रांती घेत असलेल्या बसवय्या-नायक यांच्या स्मरणार्थ वीरगळ

'वीरगळ' म्हणजे युद्धात किंवा कोणत्याही संग्रामात वीरगती प्राप्त झालेल्या शूर योद्धेय सैनिकाच्या स्मरणार्थ उभारलेला कोरीव दगडी पाषाणस्तंभ होय. यावर, सहसा वीर पुरुषाची आकृती, त्यांची शस्त्रे, आणि कधीकधी त्यांना स्वर्गात नेणारे अप्सरा किंवा देवदूत यांचे शिल्पांकन असते. कानडी भाषेत ' कल्लू ' म्हणजे दगड ' वीरकल्लू ' म्हणजे वीराचा दगड यावरून महाराष्ट्रात वीरगळ असा शब्द या वीर योद्ध्यांच्या स्मरणार्थ शिळेला प्रचलित झाला असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. थोडक्यात वीरगळमध्ये युद्धात धारातीर्थी पडलेल्या पुरुषाचे स्मरण असते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सहसा देवळांजवळ किंवा शेतात आढळणारे हे या स्मारकशिळा इतिहासाच्या मूक साक्षीदार आहेत, विरगळाच्या निर्मितीकाळाचा उगम साधारणपणे शिलाहार काळापर्यंत मागे जातो. महाराष्ट्रातही शिवकाळापूर्वी आणि काळातील अनेक गावांत हे वीरगळ गावाचे रक्षण करताना प्राण अर्पण केलेल्या योद्ध्यांची आठवण म्हणून उभे आहेत. हे केवळ मूक दगड नसून ते तत्कालीन युद्धकला, शस्त्रे, पोषाख आणि तत्कालीन सामाजिक जीवनाची माहिती देतात. गावागावांत शेंदूर फासून पूजले जाणारे ह...

सोपारा येथील ऐतिहासिक स्तूप...!!!

सोपारा हे पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात स्थित आहे. ज्यास आज नालासोपारा असेसुद्धा ओळखले जाते. नालासोपारा हे मुंबईच्या जवळ असलेले एक वेगाने विकसित होणारे उपनगर असले, तरी या सोपाऱ्याचा प्राचीन इतिहास अत्यंत समृद्ध आहे. आज आपण सोपारा आणि येथील प्राचीन स्तूपाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी, आपण सोपाराच्या प्राचीन इतिहासावर एक संक्षिप्त दृष्टिक्षेप टाकूया. ज्या काळात मुंबई हे लहान-लहान बेटांमध्ये विभागलेले होते, त्या काळात सोपारा हे एक अत्यंत समृद्ध शहर तथा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे एक महत्त्वाचे बंदरही होते. येथून अरब, ग्रीक, रोम, मेसोपोटेमिया आणि आफ्रिकन देशांशी व्यापार केला जात असे. इसवी सन १५० मध्ये, ग्रीक भूगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ टॉलेमी याने आपल्या 'जिओग्राफी' (Geography) या ग्रंथात सोपारा हे नवसारी आणि चौल यांच्या दरम्यान वसलेले असल्याचे नमूद केले आहे. तसेच, पहिल्या शतकात रचलेल्या 'पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी' (Periplus of the Erythraean Sea) या ग्रंथात सोपारा हे ठिकाण भृगुकच्छ (सध्याचे भरूच) आणि कल्याण यांच्या दरम्यान असल्याचे नमूद करण...

यज्ञाच्या अनुषंगाने केलेली मांडणी व पुरातत्वशास्त्राचे जाणकार अभ्यासक बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित इतिहास संशोधनावर आधारित प्रसिद्ध ग्रंथ क्रांती आणि प्रतिक्रांती आपणापैकी बहुत जणांनी वाचला असेल, त्याचे अध्ययन केले असेल. त्यांच्या याच प्रसिद्ध ग्रंथातील एक परिच्छेद पुढीलप्रमाणे असून मी तो, महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड ३, पृ. क्रं. १७४ (इंग्रजी आवृत्ती) मधून घेतला आहे. तो परिच्छेद पुढीलप्रमाणे... Every sacrifice meant fee to the priest. As to fee, the rules were precise and their propounders were unblushing. The priest performed the sacrifice for the fee alone, and it must consist of valuable garments, kine, horses or gold when each was to be given was carefully stated. The priests had built up a great complex of forms where at every turn fees were demanded. The whole expense, falling on one individual for whose benefit the sacrifice was performed, must have been enormous. How costly the whole thing became can be seen from the fact that in one place the fee for the sacrifice is mentione...

इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा

नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधार...

मैत्री - प्रथम व अंतिम मानव धर्म

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा...

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

खोपोली येथील KP Waterfall अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा

दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी खोपोली येथील KP WATERFALLS अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा येथे भेट दिली. हा धबधबा मुळात लोणावळा - कल्याण रेल्वे मार्गावरील मुंबई अप viaduct -6 येथे स्थित आहे. याचे स्थान इतर कोणत्याही धबधब्यापेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे. येथे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या खोपोली रेल्वेस्थानक येथे उतरावे लागते. खोपोली रेल्वे स्थानक येथे उतरले असता संपूर्ण बोरघाटाची डोंगररांग आपल्या दृष्टीस पडते. या स्थानकावरून काहीसे पूर्वोत्तर पाहिले असता डोंगरावर एक ब्रीज गेलेला दिसून येतो. हाच आहे तो वर उल्लेख केलेला पुणे - कल्याण रेल्वे Viaduct आणि नेमके येथेच आपल्याला जायचे आहे. या सफरीसाठी मी रोहित रा. भोसले व प्रफुल्ल पुरळकर असेच दोघे होतो. मध्य रेल्वेच्या खोपोली स्थानकावरून पूर्वेला बाहेर पडत आपण झेनिथ धबधबा येथे जाण्यासाठी रिक्षा करावी किंवा अंतर जवळच असल्याने पायी - पायी पण रमत गमत हे अंतर पार करता येईल. आम्ही खोपोली येथे उतरल्यावर हे अंतर रमत गमत पायी कापायचे असे ठरवले. येथील धबधबे हे केवळ पावसाळी असल्याने या दिवसात या धबधब्याची सफर केलात तेही आठवड्याच्या शनिवार, र...

किल्ले गुमतारा - एकांतवासात दिवस कंठत असलेला अल्पपरिचित दुर्ग

काही ठिकाणांनी आपल्या भौगोलिक स्थानामुळे इतिहासात महत्वपूर्ण भूमिका बजावली असतात. पण पुढील काळात वाढत्या आधुनिकीकरण तसेच शहरीकरणामुळे हा इतिहास मागे पडत चालला असताना; ती ठिकाणे मात्र एकांतवासात हरवतात. शोधलीत तर अशी खुप ठिकाणे आपल्या अवतिभोवती दिसून येतील. अशाच अनेक ठिकाणांपैकी एक भिवंडीजवळील किल्ले गुमतारा होय. हरेंद्र मास्तर यांनी सदर किल्ल्याच्या भटकंतीसाठी आदल्या दिवशी विचारणा केली आणि खुप दिवस किल्ले भटकंती केली नसल्याने लागलीच होकार दिला. गुमतारा किल्ला हा कल्याण येथून ३१ किमी अंतरावर असून, कल्याण येथून भिवंडी - वाडा रोडवर वज्रेश्वरीच्या अलीकडे १० किमी अंतरावर दुगाड फाटा येथून आत दुगाड, मोहीली तसेच घोटेगाव गावाच्या हद्दीत उभा आहे. या किल्ल्याला घोटवड किल्ला, दुगाड किल्ला, गोतारा अशी आणखी काही नावे आहेत. चारही बाजूंनी घनदाट जंगलात उंच टेकडीवर असलेला हा किल्ला चढण्यास मध्यम श्रेणीचा असला तरीही या किल्ल्यावर जाणाऱ्या अनेक पायवाटा - ढोरवाटा हा मार्ग जिकरीचा करतात. जंगलटप्पा पार करून वरील भाग काहीसा निसरडा मुरुमाचा आहे. तेव्हा हा भाग करताना जरा जपून अन्यथा तुमची एक चूक तु...

चक्रवर्ती सम्राट अशोक यांची संबोधी स्थळास भेट

चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी राजाभिषेकानंतर दहाव्या वर्षी संबोधी (बोधगया) यात्रा केली होती, अशी नोंद सम्राटांनी कोरविलेल्या गिरनार येथील आठव्या शिलालेखात आहे. हा कालखंड अंदाजे ख्रिस्तपूर्व २६० मधील असावा. ज्या ठिकाणी सिद्धार्थ गोतम यांना संबोधी प्राप्त झाली, त्याठिकाणी बुध्दांच्या स्मरणार्थ महत्त्वाची विशेष वास्तू उभारावी या हेतूने सम्राट अशोक यांनी एका रत्नजडित वज्रासनाची स्थापना केली. यामागे त्यांचा हेतू मूळ संबोधी स्थळाची नेमकी जागा लोकांना कळून यावी हा होता. आज संबोधी स्थळ जे काही भव्यदिव्य दिसते त्याची वीट पहिल्यांदा रचणारे हे सम्राट अशोक होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या प्रसंगावर आधारित शिल्प सांची, भरहुत स्तूपाबरोबरच खालील जोडलेले जे चित्र आहे अशा सन्नती येथील भग्न स्तूपाच्या अवशेषावर देखील शिल्पांकित आहे. सदर चित्रात एक बोधिवृक्ष असून त्याखाली एक रिक्त आसन (वज्रासन) दिसून येते आहे. आसनाच्या खाली पादपिठावर धम्मचक्र वलयांकित बुद्धांचे धम्मकाया स्वरूपातील पदचिन्ह शिल्पित आहे. या वज्रासनास सहृदय वंदन करताना तसेच बोधिवृक्षास कमलपुष्प अर्पण करताना सम्राट अशोक दिस...

अपरान्ताचे लेणे… भाग २

अपरान्ताचे लेणे… भाग १  👈 इथे वाचा. कोंदिविटे लेणी, अंधेरी कोंदिविटे लेणी मुंबई उपनगरातील अंधेरीजवळ वेरावली पर्वतावर असलेला महत्वाचा लेणीसमूह असून हा लेणी समूह कान्हेरी लेणीचे उपकेंद्र म्हणून प्राचीनकाळी कार्यरत असावे. जवळच असलेल्या कोंदिविटे गावाच्या नावावरून या समुहास कोंडीविते लेणी असे म्हटले जाते. या लेणीला महाकाली लेणी असे दुसरे नावदेखील प्रचलित आहे. लेणीच्या पायथ्याशी महाकाली मंदिर असून या मंदिराच्या गाभाऱ्यात एक देवतेचे शिल्प कोरलेल्या काम्य-स्तुपाची पूजा महाकाली म्हणून केली जाते. त्या स्तुपावर असलेली वज्रयान पंथाची रक्षक देवता महाकाळच्या नावावरून या लेणीला महाकाली लेणी असे म्हटले जाते. इसवी सन पहिल्या ते सहाव्या शतकात कोरलेल्या १९ लेणींचा गट असून पूर्वेस १५ तर पश्चिमेस ४ लेण्या आहेत. यात चैत्यगृह, भिक्खु विहार,पानपोढी यांचा समावेश होतो. यातील क्रमांक ९ ची लेणी हे चैत्यगृह प्रकारातील असून यातील थेरवाद कालीन स्तूप एका विशिष्ट वर्तुळाकार रचनेच्या आत असलेला दिसतो. त्या भिंतीला दोन्ही दिशेला मूळ दगडात कोरलेल्या जाळीदार खिडक्या असून डाव्या बाजूच्या खिडकीव...

अपरान्ताचे लेणे… भाग १

अपरान्त म्हणजे पश्चिमेचा अंत… अर्थात जिथे पश्चिम दिशेचा अंत होतो असा प्रदेश अथवा देश म्हणून प्राचीनकाळी या कोंकण प्रदेशास अपरान्त म्हणून ओळखले जात होते. प्राचीन साहित्यात या अपरान्त देशाच्या व्याप्तीविषयी एकवाक्यता नसल्याने याचे निश्चित स्थान ठरवणे कठीण आहे. तरीदेखील तापी नदीच्या मुखाच्या दक्षिणेकडील आणि चिपळूणच्या वाशिष्ठी नदीच्या उत्तरेकडील प्रदेशास प्राचीनकाळी अपरान्त असे म्हटले जात असावे. तसेच; काही अभ्यासकांच्या मते अपरान्त म्हणजे मुंबईपासून ठाणे, नाशिक, गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान आणि सिंध असा विस्तृत प्रदेश असावा. सम्राट अशोक यांनी आपल्या कार्यकाळात भरवलेल्या तिसऱ्या धम्मसंगितीची एक क्रांतिकारक निर्णय घेतला. आपल्या राज्यातील प्रजा नीतीने वागते आहे की नाही, हे पाहण्यासाठी व धम्माचे योग्य पालन करण्यासाठी मार्गदर्शनार्थ वेगवेगळ्या प्रदेशात धम्ममहामात्रांची नियुक्ती केली होती. त्यापैकी; अपरान्तात योनधम्मरक्खित नामक स्थविरास पाठवले असा उल्लेख प्राचीन बौद्ध साहित्य महावंसमध्ये सापडतो. हा अपरान्त प्रदेश पश्चिम महाराष्ट्रापासून वेगळा होण्याचे कारण म्हणजे उत्तर – दक्षिण अशी प...